गाव पातळीवर पक्ष मजबूत करा। :- धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन

116

गाव पातळीवर पक्ष मजबूत करा। :- धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन
एटापल्ली : गाव हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे। याचं गावांमधून राजकीय पक्ष विकसित होतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावांना, खेड्यांना महत्त्व देणारा पक्ष आहे। म्हणून गाव पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत मजबूत करावा असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री व अहेरी विधानसभा मतदार संघाचे विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केले।
नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणूक मध्ये निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। सत्कार समारंभ चे आयोजन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस एटापल्ली च्या वतीने करण्यात आले होते।
प्रसंग अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते।
आयोजित कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी धर्मराव बाबा आत्राम होते। प्रमुख अतिथी भाग्यश्री आत्राम-हलगेकर माजी जि प अध्यक्ष, ऋतुराज हलगेकर प्रदेश उपाध्यक्ष,दौलत दहागाव कर तालुका अध्यक्ष यांची होती।
कार्यक्रम ची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली।
प्रसंगी बोलताना धर्मराव बाबा म्हणाले की, ग्राम पंचायत निवडणुकीत एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस
पक्ष ला अभुतपुर्व यश मिळाले। याचे श्रेय कार्यकर्ते वर्गास जाते। मेहनतीने मिळालेले यश दीर्घकाळ टिकवून ठेवणे आवश्यक आहे। यश दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी पक्ष गाव पातळीवर मजबूत करणे आवश्यक आहे। सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थां शी समन्वय ठेवावा। पक्षाची ध्येय,धोरण सर्वसामान्य माणसाला समजून सांगावी व पक्ष मजबूत करावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले।
माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांनी यावेळेस मार्गदर्शन केले। गावाच्या राजकारण मध्ये महत्वाची भूमिका बजावावी। विकासात्मक राजकारण करून आपले अस्तित्व महिलांनी सिद्ध करावे। दुर्गम, आदिवासी बहुल भागातील महिला मागे नाहीत हे दाखवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले।
तालुक्यातील सर्वच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यावेळेस उपस्थित होते।
कार्यक्रम चे संचालन बेबी लेकामी यांनी केले। आभार लक्समन नरोटे यांनी मानले।