पाच युवकांचा तलावात बुडून मृत्यू; गावात शोककळा

18

पाच युवकांचा तलावात बुडून मृत्यू; गावात शोककळा

 

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी पर्यटनासाठी गेलेले पाच युवक तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, १५ मार्च रोजी चार वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवित पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

 

सदर युवक हे चिमूर तालुक्यातील सारगाव कोलारी येथील आहेत, जनक किशोर गावडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजरा बालाजी गावंडे व तेजरा संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या युवकांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन घुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे.

शनिवारी चिमूर तालुक्यातील साटगाय कोलारी वैधील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारपासून त्यांनी घोडाडारी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांना पोहावयाचे राहवले नाही. त्यामुळे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले, त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली मुलगा कसाबसा वाचता तर उर्वरित जनक किशोर गावडे यश किशोर गावडे, अनिकेत यशवंत गावडे तेजस बालाजी गावंडे. तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली.

सर्व मुले १८ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत.

 

तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवध्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाचही मुले उलावातच बुढालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू करीत तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले.