*गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने 22 एप्रिल रोजी, देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन*
*काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार मसराम यांची पत्रकार परिषदेतून माहिती*
*नियमित विजपूरवठा व रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यासह इतर मागण्यांचा समावेश*
गडचिरोल:: गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय हा शेतीवर अवलंबून आहे मात्र शेतीला विजपुरवठा खंडित करण्यात येत आहे, या संदर्भात विजपुरवठा नियमित करण्यात यावा तसेच रानटी हत्तीनी मोठी धुमाकूळ घातली असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा म्हूणन वारंवार मागणी होत असताना देखील अजून पर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली नसल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने 22 एप्रिल रोजी, देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदास मसराम यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
यावेळी माजी जि.पं.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पंकज गुड्डेवार, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्ष ऍड. सौ. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, तलुका अध्यक्ष चामोर्शी प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नितेश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे,जिल्हाध्यक्ष सहकार सेल अब्दुल पंजवानी, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस शकरारावं सालोटकर,स्वप्निल बेहरे ता.अध्यक्ष युवक काँग्रेस,प्रभाकरजी वासेकर, जितेंद्र मुनघाटे,उत्तम ठाकरे,योगेश झंझाड,रवींद्र चापले,प्रशांत कोराम, चारू पोदाणे,विपुल एलटीवार,गौरव पुणप्रेडीवार,कुणाल ताजने,अमर बरे,जावेद खान,प्रेमानंद गोंगले अपर्णाताई खेवले,आशाताई मेश्राम,कल्पनाताई नंदेश्वर,रिताताई गोवर्धन,सुनीताताई रायपुरे,
सह इतर पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनातील इतर मागण्या
◆विद्युत मीटर करिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत विद्युत मीटर मिळाले नाही किंवा त्या जागी सोलर पंप सुद्धा मिळाले नाही.
◆ शेतकरी आणि लोकप्रतिनिधीकडून वारंवार विरोध होत असताना सुद्धा शासनाने विमानतळाकरीता पुलखलं परिसरातील सुपीक शेत जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे ते त्वरित थांबवावे व शेतकऱ्यांशी चर्चा करावी.
◆ चामोर्शी भेंडाळा परिसरातील एमआयडीसी करिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या शेतजमिनीचे दर वाढवून देण्यात यावे व शेतकऱ्यांशी चर्चा करूनच जमीन अधिग्रहित करण्यात यावे.
◆जिल्ह्यात शासकीय धान खरेदी विक्री केंद्रावर व राईस मिल मध्ये वारंवार धान घोटाळ्याचे प्रकरण उघड केस येत आहे त्यामुळे ह्या दान घोटाळ्यावर आळा घालण्याकरिता उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करून दोशींवर कडक कारवाई करण्यात यावी.
◆शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
◆ घरकुल करिता रेती उपलब्ध करून देण्यात यावे.
◆मनरेगा अंतर्गत प्रलंबित असलेले थकीत पैसे त्वरित देण्यात यावे.
◆ जिल्ह्यातील प्रलंबित असलेले राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्याचे काम मान्सून पूर्व तातडीने पूर्ण करावे.
◆जिल्ह्यातील विविध विभागात अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची कामे खोडंबतात त्यामुळे रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावे.